आकाशाकडे काही वेळ नजर लाऊन बसल्यास नक्कीच 'तारा' गळाल्याचे दिसू शकते. खरे पाहता तारे कधीच गळून पडत नाही. आपल्याला दिसलेला गळालेला तारा ही छोटीशी उल्का असते. आकाशातील वाळूंच्या काना एवढ्या आकाराचे कण वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरतात, तेव्हा घर्षणाने तापून पेटतात व क्षणभरच आपल्याला तारा गळाल्यासारखे वाटते.
आकाशात हिंडणारे वालुकामय कण, लघुग्रह व छोट्या-मोठ्या पाषाणांचे छोटे कण व धूमकेतूंच्या शेपटीतील धूळ व छोटे कण यांच्यामुळे उल्कांचा आविष्कार दिसू शकतो, हे कण पृथ्वीच्या वातावरणात सेकंदाला १० ते ३० किलोमीटर वेगाने घुसतात व पृथ्वीपासून सुमारे १३० किलोमीटर उंचीवर पेटतात. क्षणभरातच त्यांची राख होते व ते दिसेनासे होतात. कित्येक वेळेस पेटलेल्या उल्का सोनेरी, पिवळसर किंवा हिरवट रंगाची झाक दाखवत कोसळतात. उल्केतील प्रचंड उष्णतेमुळे, धातूंच्या कणांमुळे व आजूबाजूच्या वातावरणातील वायूंच्या तापण्यामुळे, उल्का रंगेबेरंगी व प्रसंगी मागे धुराची रेषा ठेवीत नाहीशा होताना दिसतात. अंधारया ठिकाणून तासाला पाच-दहा उल्का पडताना आपण पाहू शकतो. मात्र दिवसभरात संपूर्ण पृथ्वीवर दोन ते तीन कोटी उल्का कोसळतात. यामुळे पृथ्वीवर दरवषी दहा हजार टनांची उल्कांची राख व अवशेष कोसळतात. उल्कांचा आविष्कार दाखवणारे आकाशस्थ पदार्थ मोठ्या आकाराचे असल्यास ते संपूर्ण पाने न जळता पृथ्वीवर कोसळतात. अशा पाषाणांना 'अशनी' म्हणतात. ते पृथ्वीवर कोसळताना मोठी प्रकाश ललका आकाशात दिसते व वातावरणात शिरताना मोठा आवाज करीत ते फुटतात.
धोकादायक उल्कापाषाण - आकाशात उल्का क्षणभरच दिसतात. वाळूच्या कणांच्या उल्का पृथ्वीवर पोचेपर्यंत जळून नाहीशा होतात.मात्र कधी कधी मोठे पाषाण कोसळ्यास मोठी हानी होते. ते संपूर्ण न जळाल्याने मोठा आवाज करीत पृथ्वीच्या वातावरणात शिरताना फुटतात. त्यांना 'अशांनी' म्हणतात. पृथ्वीवर कोसळलेल्या उल्का पाशानांना 'मिटी ओराईट' म्हणतात.
पुरातन काळी मोठा उल्का पाषाण पृथ्वीवर कोसळला असावा. दर सेकंदाल ४०-४५ किलोमीटर वेगाने तो पृथ्वीवर कोसळतान महाभयानक स्फोट झाला. कोट्यावधी बॉम्बच्या स्फोटाएवढी ताकद त्यात असल्याने पृथ्वी थरथरली, अब्जावधी टन पेटते दगड व माती उंच आकाशात उधळली गेली. वातावरणात पसरलेल्या धुळीने व धुराने पृथ्वीभोवती अंधकार निर्माण केला. कदाचित काही महिने पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोचू न शकल्याने त्या काळात पृथ्वीवर वावरणारे डायनासोर्स सारखे मोठे प्राणी मृत्युमुखी पडू लागले. वनस्पती व प्राणी यांचे अतोनात नुकसान झाले. पृथ्वीवर मोठे पाषाण कोसळल्यावर अशी घटना घडते व ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी अशीच घटना घडली असावी. या प्रकारची प्रलयकारी घटना क्वचित म्हणजे १-३० कोटी वर्षात एखादेच वेळेस घडू शकते. सैबेरियातील तुन्गुस्कामध्ये कोसळलेल्या अशानी किंवा धूमकेतूने ४०० मैलांचा परिसर उद्ध्वस्थ केला होता. अमेरिकेतील अरॆसोन येथील विवर व महाराष्ट्रातील लोणार येथील विवर मोठ्या अशांनी किंवा धुमकेतूच्या कोसळण्यामुळे निर्माण झाली असावीत, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.त्यांच्या मते १ किलोमीटर आकारापेक्षा छोटे पाषाण फारसा विध्वंस करीत नाहीत. मात्र, त्यापेक्षा मोठे पाषाण मानवजातीला धोका निर्माण करू शकतात.
No comments:
Post a Comment