
चंद्र सूर्याच्या आकर्षणामुळे समुद्राला भारती येत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. त्याचप्रकारे ग्रह जवळ जवळ दिसू लागल्यावर त्यांच्या एकत्रित गुरुत्व कर्षनामुळे पृथ्वीवर प्रलयकारी स्थिती निर्माण होऊ शकते, तसा गैरसमज अनेक लोकांमध्ये दिसतो. अगदी अलीकडेच जोन ग्रीबीन यांनी १९८२ मध्ये झालेल्या ग्रहांच्या युत्यांमुळे सूर्यावर भारती येउन वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन त्याचा फटका पृथ्वीवासीयांना बसेल, असे त्यांच्या पुस्तकात लिहून घबराट पसरवली होती. तसेच त्यांनी याचमुळे कलीफोर्नियामध्ये भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती. भारतासह संपूर्ण जगात ५ फेब्रुवारी १९६२ रोजी अष्टग्रहीचा परिणाम म्हणून पृथ्वी नष्ठ होणार असल्याची अफवा पसरली होती. अगदी अलीकडेच म्हणजे मे २००० मध्ये चंद्रसुर्यासह पाच ग्रह एकत्र आले होते या दिवशी 'प्रलय होणार' अशी अफवा पसरवल्याने लोकांनी पळापळ केली.
शास्त्रान्यांच्या मते पृथ्वीवर परिणाम करू शकणारा त्याच्या जवळचा एकुलता एक पिंड चंद्रच आहे. इतर ग्रहगोल व सूर्य खूपच दूर असल्याने त्याचा फार मोठा परिणाम पृथ्वीवर होऊ शकत नाही. सूर्यासह सर्व ग्रहांचे गुरुत्वाकर्षण एकत्र केल्यास ते चंद्राच्या गुरुत्व कार्षानापेक्षा कमीच म्हणजे निम्मेच असते. याचमुळे सर्व ग्रह मंडळी व सुर्य याचा परिणाम पृथ्वीवर होऊन प्रलय होईल असे वाटण्याचे काहीच कारण नाही. तसेच चंद्र , सुर्य व सर्व ग्रह एका ओळीत येउन पृथ्वीवर परिणाम घडवतील हे अशक्यप्राय असल्याने आकाशात दिसणाऱ्या ग्रहांच्या संमेलनाविषयी घाबरून न जाता तो दुर्मिळ खगोलीय आविष्कार समजून त्याच्या निरीक्षणाचा आनंद घ्यावयास हवा.

बहिर्युती-अंतर्युती-बुध-शुक्र हे सुर्य जवळचे ग्रह असल्याने ते सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर थोडा वेळ क्षितिजावर दिसतात. पृथ्वीच्या आतल्या कक्षेतून ते फेरी मारतात. ते अधून मधून पृथ्वी व सुर्य यांच्यामध्ये येताना सूर्याशी युती करतात. त्यास अंतर्युती असे म्हणतात. या वेळी ग्रहाची अप्रकाशित बाजू आपल्याकडे असते व त्यामुळे तो दिसत नाही.
अंतर्युतीनंतर ग्रह सूर्यापासून जास्तीत जस्त २८ कोनीय अंशावर तर शुक्र ४७ कोनीय अंशापर्यंत दूर जाऊ शकतो. या स्थितीस ' परम इनांतर ' असे म्हणतात. यानंतर पुन्हा ग्रह सूर्याकडे सरकताना दिसू लागतो व संधिप्रकाश नाहीसा होतो. काही काळ तो सुर्यामागे गेल्याने त्यांची बहिर्युती पूर्वी व अंतर काही आठवडे ग्रह दिसू शकत नाही. युती नंतर पश्चिम क्षितिजावर सूर्यास्तानंतर दिसू लागतो. हळूहळू तो क्षितिजावर उंच उंच चढू लागून पुन्हा 'परमइनांतर' अंतरावर पोचतो.
No comments:
Post a Comment