
सुर्य आणि त्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा जन्म केव्हा व कसा झला असावा या विषयावर शास्त्रज्ञ शेकडो वर्षांपासून संशोधन करत आहेत. यामध्ये १६६४ मध्ये रेने डेकार्ट याचे संशोधन पायाभूत मानले जाते. त्यांच्या संशोधनानुसार सूर्यमाला वायू व धूळ या प्रकारच्या पदार्थांपासून तयर झाली व ते स्वताभोवती फिरताना निर्माण झालेल्या गोळ्यातून एखादी चकती बाहेर पडून ग्रह तयार झाले असावेत. सूर्याभोवती फिरणारे ग्रह एकाच दिशेने व एकाच पातळीत अधाल्याने सुर्यामाला सुर्याभिक्रतेपासून तयार झाली असल्याचे कंट व लाव्हासे नावाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले. त्यांच्या मते वायू व धुळीच्या स्वताभोवती फिरणाऱ्या मोठ्या ढगातून सूर्य व ग्रहमाला तयार झाली असावी. आपल्या आकाश गंगेमधील धुलीकण व वायूंच्या विशाल मेघांपासून सुमारे पाच अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला तयार झाली. काहीतरी कारणांमुळे वायूच्या विशाल मेघांमध्ये हालचाल झाली व तो आकुंचन पावला. त्याच्यातील पदार्थांचे कान एकमेकांजवळ येऊ लागले व मेघ स्वतःच्याच गुरुत्वाकार्षानामुळे आकुंचन पावताना स्वताभोवती फिरू लागला. आतल्या भागाचे तापमान वाढू लागले व गोलाकार आकाराच्या मेघाच्या विषु वृत्ताजवळ पदार्थांची चकती तयार होऊ लागली. मेघाच्या मध्यभागी सूर्याच्या जन्माची प्रक्रिया चालू झाली, तर बाहेरील चाकतीमधील पदार्थांचे कण एकमेकांस चिकटले जाऊन लहानमोठे दगडधोंडे तयार होऊ लागले. यातूनच लघुग्रहाची निर्मिती सुरु झाली. हे छोटे गोळे एकमेकांवर आपटून मोठे गोळे व त्यातूनच ग्रहांचा जन्म झाला. सूर्याजवळ असलेल्या जड मुलद्रव्यांतून बुध,शुक्र, पृथ्वी, व मंगलासारके घनरूप ग्रह तर दूरच्या अंतरावर असलेल्या वायुमधून गुरु, शनि यांसारखे वायुरूप बाह्य ग्रह तयार झाले.

बिग बँग
आपली पृथ्वी व सूर्यमाला विश्वाचा छोटा हिस्सा आहे. सर्व तारे तारका विश्व्व पुरताना काळापासून आहेत तशीच दिसतात. म्हणजेच विश्वात फारसा बदल होत नसल्याने ते 'स्थिर' आहेत, असे पूर्वी मानले जायचे. मात्र एडविन हबल या खगोल शास्त्रज्ञाने तारका विश्वे व त्यांचे अंतर यांचा संबंध तपासून विश्व प्रसारण पावत असल्याचे दाखवून दिले. ताराकाविश्वे कधी काळी एकमेकांजवळ असले पाहिजेत, असे ध्यानात आल्याने विश्वाचा जन्म एका बिंदुतून महास्फोटातून झाला असावा, असे काही शास्त्रज्ञ म्हणू लागल;ऐ. साधारण पाने १० - १५ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटात अवकाश , काळ आणि वस्तू यांची निर्मिती झाली असावी. या महास्फोताला 'बिग बँग थिअरी' म्हणून ओळखले जाते. खरे पाहता बिग बँग चे नामकरण करणाऱ्या ब्रिटीश खगोल शास्त्रज्ञ फ्रेड होएल यांना बिग बँग मान्य नव्हते. त्यांनी चेष्टेच्या सुरत पृथ्वीची उत्पत्ती बिग बँग मध्ये झाली नसावी, असे म्हटले. होईल यांच्या मते विश्वाचा जन्म स्फोटात झाला नसून ते पुरातन काळापासून आहे, तसेच आहे. त्यांनी हर्मान्न बोंडी व थोमस गोल्ड या सहकार्यांसमवेत स्थिर स्थितीचा म्हणजेच स्टेडी स्टेट थिअरॆच सिद्धांत मांडला. मात्र या सिद्धान्तान्वाये विश्वात सतत पदार्थंची निर्मिती होत असते. याविषयी शास्त्रज्ञांचे एकमत होत नसल्याने व बिग बंगब सिद्धांताला पुष्ठी देणारे पुरावे मिळत गेल्याने स्थिर स्थितीचा सिद्धांत मागे पडला. बिग बँगच्या सिद्धांतानुसार स्फोटानंतर पहिल्या तीन मिनिटात प्रोटोन या सारखे कान निर्माण झाले व एक अब्ज वर्षामध्ये तारे व ताराकाविश्वातील तर्यान्मधून पुढील काळात ग्रहमाला निर्माण झाल्या असाव्यात.

No comments:
Post a Comment