Wednesday, 5 March 2014

जन्म सूर्यमालेचा


सुर्य आणि त्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा जन्म केव्हा व कसा झला असावा या विषयावर शास्त्रज्ञ शेकडो वर्षांपासून संशोधन करत आहेत. यामध्ये १६६४ मध्ये रेने डेकार्ट याचे संशोधन पायाभूत मानले जाते. त्यांच्या संशोधनानुसार सूर्यमाला वायू व धूळ या प्रकारच्या पदार्थांपासून तयर झाली व ते स्वताभोवती फिरताना निर्माण झालेल्या गोळ्यातून एखादी चकती बाहेर पडून ग्रह तयार झाले असावेत. सूर्याभोवती फिरणारे ग्रह एकाच दिशेने व एकाच पातळीत  अधाल्याने सुर्यामाला सुर्याभिक्रतेपासून तयार झाली असल्याचे कंट व लाव्हासे नावाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले. त्यांच्या मते वायू व धुळीच्या स्वताभोवती फिरणाऱ्या मोठ्या ढगातून सूर्य व ग्रहमाला तयार झाली असावी. आपल्या आकाश गंगेमधील धुलीकण व वायूंच्या विशाल मेघांपासून सुमारे पाच अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला तयार झाली. काहीतरी कारणांमुळे वायूच्या विशाल मेघांमध्ये हालचाल झाली व तो आकुंचन पावला. त्याच्यातील पदार्थांचे कान एकमेकांजवळ येऊ लागले व मेघ स्वतःच्याच गुरुत्वाकार्षानामुळे आकुंचन पावताना स्वताभोवती फिरू लागला. आतल्या भागाचे तापमान वाढू लागले व गोलाकार  आकाराच्या मेघाच्या विषु वृत्ताजवळ  पदार्थांची चकती तयार होऊ लागली. मेघाच्या मध्यभागी सूर्याच्या जन्माची प्रक्रिया चालू झाली, तर बाहेरील चाकतीमधील पदार्थांचे कण एकमेकांस चिकटले जाऊन लहानमोठे दगडधोंडे तयार होऊ लागले. यातूनच लघुग्रहाची निर्मिती सुरु झाली. हे छोटे गोळे एकमेकांवर आपटून मोठे गोळे व त्यातूनच ग्रहांचा जन्म झाला. सूर्याजवळ असलेल्या जड मुलद्रव्यांतून बुध,शुक्र, पृथ्वी, व मंगलासारके घनरूप ग्रह तर दूरच्या अंतरावर असलेल्या वायुमधून गुरु, शनि यांसारखे वायुरूप बाह्य ग्रह तयार झाले.




बिग बँग

आपली पृथ्वी व सूर्यमाला विश्वाचा छोटा हिस्सा आहे. सर्व तारे तारका विश्व्व पुरताना काळापासून आहेत तशीच दिसतात. म्हणजेच विश्वात फारसा बदल होत नसल्याने ते 'स्थिर' आहेत, असे पूर्वी मानले जायचे. मात्र एडविन हबल या खगोल शास्त्रज्ञाने तारका विश्वे व त्यांचे अंतर यांचा संबंध तपासून विश्व प्रसारण पावत असल्याचे दाखवून दिले. ताराकाविश्वे कधी काळी एकमेकांजवळ असले पाहिजेत, असे  ध्यानात आल्याने विश्वाचा जन्म एका बिंदुतून महास्फोटातून झाला असावा, असे काही शास्त्रज्ञ म्हणू लागल;ऐ. साधारण पाने १० - १५ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटात अवकाश , काळ आणि वस्तू यांची निर्मिती झाली असावी. या महास्फोताला 'बिग बँग थिअरी' म्हणून ओळखले जाते. खरे पाहता बिग बँग चे नामकरण करणाऱ्या ब्रिटीश खगोल शास्त्रज्ञ फ्रेड होएल यांना बिग बँग मान्य नव्हते. त्यांनी चेष्टेच्या सुरत पृथ्वीची उत्पत्ती बिग बँग मध्ये झाली नसावी, असे म्हटले. होईल यांच्या मते  विश्वाचा जन्म स्फोटात झाला नसून ते पुरातन काळापासून आहे, तसेच आहे. त्यांनी हर्मान्न बोंडी व थोमस गोल्ड या सहकार्यांसमवेत स्थिर स्थितीचा म्हणजेच स्टेडी स्टेट थिअरॆच सिद्धांत मांडला. मात्र या सिद्धान्तान्वाये विश्वात सतत पदार्थंची निर्मिती होत असते. याविषयी शास्त्रज्ञांचे एकमत होत नसल्याने व बिग बंगब सिद्धांताला पुष्ठी देणारे पुरावे मिळत गेल्याने स्थिर स्थितीचा सिद्धांत मागे पडला. बिग बँगच्या सिद्धांतानुसार स्फोटानंतर पहिल्या तीन मिनिटात प्रोटोन या सारखे कान निर्माण झाले व एक अब्ज  वर्षामध्ये तारे व ताराकाविश्वातील तर्यान्मधून पुढील काळात ग्रहमाला निर्माण झाल्या असाव्यात.



प्रतियुती


मंगळ-गुरु,शनि यासारखे बहिर्ग्रह पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेतून सुर्य भोवती फेरी मारतात, तसेच ते सूर्यापासून खूप दूर असल्याने बहुध-शुक्र प्रमाणे मोठ्या कोनीय अंतरावर दिसण्या ऐवजी मोठ्या कोनीय अंतरावर दिसू शकतात. याचमुळे ते फक्त क्षितिजा जवळ व थोडाच वेळ न दिसत रात्रभर आकाशात कोठेही दिसतात. सूर्याभोवती फेरी मारताना हे सुर्यामागे गेल्यावर त्यांची युती झाल्याने ते दिसू शकत नाही. त्यानंतर सूर्यापासून दूर होत पहाटेच्या आकाशात ते दिसू लागतात. 
दररोज लवकर लवकर उगवणारा हा बहिर्ग्रह काही काळातच मध्यरात्री उगवू लागतो. या वेळी त्याचे सूर्यापासूनचे कोनीय अन्तर ९० अंश होते. त्याचे लवकर उगवणे चालू राहून तो संध्याकाळी उगवताना दिसतो. म्हणजेच त्याचे कोनीय अंतर १८० अंश होते. या वेळी हा बहिर्ग्रह पृथ्वीच्या एका बाजूला व  पृथ्वीच्या दुसर्या बाजूला सुर्य असतो. थोडक्यात पृथ्वीच्या दृष्टीने ग्रह बरोबर सूर्यासमोर येतो. या स्थितीस प्रतोयुती म्हणतात. प्रतियुती काळात ग्रह सूर्यास्तास पूर्वेस उगवतो. व रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयो मावळतो. या लकात ग्रह पृथ्वीजवळ असल्याने मोठा दिसतो. तसेच सुर्य प्रकाशात त्याचे पूर्ण बिंब न्हावून जात असल्याने तेजास्वीदेखील दिसतो. याचमुळे बहोर्ग्रह पाहण्याची चांगली संधी प्रतियुती वेळी मिळते.
[ग्रह, प्रतियुतीचा दिवस या क्रमाने] 
मंगळ : ३० जानेवारी २०१०
गुरु : १५ आगस्त २००९ 
शनि : ९ मार्च २००९
युरेनस : १७ सप्टेंबर २००९ 



युती

सूर्यमालेतील ग्रह वेगवेगळ्या गतीने व ठराविक अंतरावरून सुर्य भोवती फेरी मारत असतात. कधी कधी ते आकाशात ते एकमेकांजवळ आहे हे दिसतात व या आविष्कारास आपण युती म्हणतो. युती वेळी आकाशस्थ गोल एकमेकांशेजारी दक्षिणोत्तर रेषेत दिसतात. मात्र पाचही ग्रह एकमेकांजवळ आहे हे देखील आपण पाहू शकतो.


   आकाशात ग्रह मंडळी एका ठिकाणी जमू लागली कि कहिओ विपरीत घडेल, अरिष्ठ येईल असा गैरसमज पुरातन काळामध्ये सर्वसामान्यांमध्ये आढळतो. अनेक वेळा ग्रहांच्या युत्या एखादा जालाराशीच्या सानिध्यात घडत असल्यास जलप्रलय होईल वसे सांगून काहींनी सर्वसामान्यांना घाबरावलेले दिसते. तुर्कस्थानातील एका राजाने १४ सप्टेंबर ११८६ रोजी होणार्या युत्यांच्या वेळी खंडाज खणून महापुराला तोंड देण्याची तयारी केली होती. प्रत्यक्षात त्या दिवशी महओपूर सोडाच पण पावसाचा एक थेंबही पडला नाही. युरोपमध्ये देखील १५ जुलै १५२२ रोजी सूर्याजवळ पाच ग्रह येत असल्याने लाग्प्रलायाची अफवा पसरली होती. अनेकांनी धनधान्य, प[ऐसे, कापदेलात्ता घेऊन पर्वत राजाचा आश्रय त्या दिवशी घेतला होता. प्रत्यक्षात आकाश निरभ्र राहून युती विषयीची भीती निराधार ठरली. 

युतीचा दिवस या क्रमाने 

मंगळ : ४ मार्च २०१२
गुरु : २१ सप्टेंबर २०१०
शनि : २२ मार्च २०१०
युरेनस : २१ सप्टेंबर २०१० 

शोध लघुग्रहांचा


सुर्य मालेतील ग्रह ठराविक अंतरावरून सूर्याभोवती फिरताना दिसतात.  त्यांच्या सूर्यापासूनच्या अंतरामागे नियम किंवा सूत्र शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. जर्मन शास्त्रज्ञ जोहानन टीटीयस याने १७६६ मध्ये ग्रहांच्या सूर्यापासूनच्या अंतराचा नियम शोधला व त्याला योग्य ती प्रसिद्धी बर्लिन वेधशाळेच्या बोडे यांनी दिल्याने या नियमाला 'टीटीयस बोडे' म्हणून प्रसिद्धी मिळाली आणि काय आश्चर्य , शानिपलीकडे सापडलेला युरेनस ग्रह टीटीयस बोडे नियमानुसार अंतरावरच दिसला व यामुळे या नियमाला सर्वमान्यता मिळू शकली.


या नियमानुसार मंगळ-गुरु ग्रहांमध्ये एखादा ग्रह असावयास हवा होता. मात्र तेथे मोठी पोकळी दिसल्याने या पट्ट्यात नवीन ग्रह शोधण्याचे काम सुरु केले. या शोधाची सिसिली मधील पिआशॆ या खागोल निरीक्षकास  माहिती नसल्याने, त्याने १ जानेवारी १८०१ मध्ये शोधलेल्या खगोलीय पिंडास धुमकेतू म्हंटले. हा पिंड वेगळा असल्याने व मंगळ-गुरु ग्रहांच्या पोकळीत सापडल्याने, पिआशॆल सापडलेल्या धूमकेतूला ग्रहाचा मान मिळाला. त्याचे नामकरण 'सिरीस' असे केले गेले. मात्र वर्षभरातच मंगळ-गुरु ग्रहांच्या पत्त्यात अजून एक ग्रह शोधला गेला. त्याला 'पलास' नाव दिले गेले. त्यांचे आकार छोटे म्हणजे सिरीस १०००, तर पलास ६०० कि.मी. व्यासाचा आढळला. १८०४ मध्ये 'जुनो' नावाचा व १८०७ मध्ये 'व्हेस्टा' नावाचा ग्रह सापडलं. हे सर्व आकाराने छोटे असल्याने, त्यांना लघुग्रह म्हणून दर्जा दिला गेला. यानंतर अनेक लघुग्रह सापडल्याने, एखादा मोठा ग्रह फुटल्याने या भागात लघुग्रह सापडत असावेत किंवा सूर्यमाला तयार होताना छोटे ग्रहगोल एकत्र येउन मोठा ग्रह तयार झाला असावा असे शास्त्रज्ञ म्हणू लागले.



वेगवेगळ्या प्रकारचे लघुग्रह...
लघुग्रहांना इंग्रजी मध्ये 'अस्तेरोइद' नावाने ओळखले जाते.युरेनस ग्रहाचा शोध लावणाऱ्या विल्यम्स हर्षलने लघुग्रहांना हे नाव दिले. लघुग्रह जरी ठराविक कक्षेतून सूर्याभोवती फिरताना दिसतात, तर 'अटेन' सुर्य जवळच्या  कक्षेत व 'अमोर' सुर्यापासुनाच्या दूरच्या कक्षेत दिसतात. कायपर पट्ट्यातील लहानमोठ्या दगड धोंड्यांना देखील लघुग्रह म्हणून ओळखले जाते. पृथ्वीच्या कक्षेत येऊ शकणारे लघुग्रह यांना 'अपोलो किंवा निअर अर्थ 'अस्टेरोइड' असे म्हणतात. बरेसशे लघुग्रह ग्रहांप्रमाणेच दिसतात व वागतात देखील. काही लघुग्रहांना इतर ग्रहांप्रमाणे चंद्र देखील आहेत. गलिलिओ अवकाशयानाने ५६ कि.मी.  लांबीच्या इडा नावाच्या लघुग्रहाभोवती फिरणारा १.५ किलो मीटर  व्यासाचा चंद्र शोधला होता.




















   लघुग्रह कशाने बनले असावेत हे शोधण्यासाठी आपल्याला अंतराळयात जाण्याची आवश्यकता भासणार  नाही. कारण अधून मधून पृथ्वीवर लहान मोठे दगड धोंडे पडत असतात. हे दगड धोंडे लघुग्रहाचेच तुकडे असतात. साधारणपणे एक किलोपेक्षा लहान वजनाचे दगड बऱ्याच वेळा पृथ्वीवर पडताना दिसतात. या वेळी फारसा अनुचित प्रकार घडताना दिसत नाही. मात्र मोठा धोंडा पडल्यावर पृथ्वीवर मोठा स्फोट होऊन विवर निर्माण होते. अशा प्रकारची अनेक विवरे पृथ्वीवर आजदेखील पहावयास मिळतात.

प्लुटो सूर्यापासूनच सर्वात दुराचा ग्रह म्हणून ओळखला जात होता. तो सूर्यमालेच्या सीमेवरती असून, तो कायपर पट्ट्यात सापडला. कायपरच्या मते सूर्य-पृथ्वी अंतराच्या तीस ते एक हजार पट अंतरापर्यंतच्या भागात छोटे मोठे दगड धोंडे असून, ते सूर्या भोवती प्रदक्षिणा घालतात. प्लुटो हा या पट्ट्यातील मोठा धोंडा असून १९३० मध्ये त्याला शोधले गेले. १९९२ मध्ये जेव्हीट आणि लु नावाच्या शास्त्रज्ञांना या पट्ट्यात २५० कि.मी. व्यासाचा धोंडा सापडला. नंतर अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दुर्बीण वापरून कायपर पट्ट्यामध्ये एक मंद तेजाचा ठिपका शोधला.



  

Tuesday, 4 March 2014

अधिक्रमण


चंद्र सूर्याची ग्रहणे आपण पाहतो. याप्रमाणेच इतर ग्रह गोलामुळे ग्रहणे घडतात. मात्र ती सहज दिसत नाहीत. बुध - शुक्र हे अंतर ग्रह  सूर्याला ग्रहण लाऊ शकतात. मात्र, त्याचा छोटा आकार व अंतर पाहता त्यांनी सुर्य बिंबला चंद्राप्रमाणे झाकलेले आपल्याला दिसू शकत नाही. या आविष्कारास ग्रहणा ऐवजी ' अधिक्रमण ' म्हंटले जाते. अधिक्रमण नुसत्या डोळ्याने दिसू शकत नसल्याने दुर्बिणीचा शोध लागेपर्यंत कुणीच ते पाहिले नव्हते. मात्र, त्यापूर्वी टोलेमी व कोपर्निकस ने त्याची शक्यता वर्तवली होती. केप्लरने यापुढे जाऊन ग्रहगणित मांडून १६३१ मध्ये बुध - शुक्राची अधिक्रमणे दिसतील, असे त्याच्या ' rudalfeen tebals of planetary movements ' या पुस्तिकेत नमूद केले होता. केप्लरचे यापूर्वीच निधन झाल्याने तोही अधिक्रमण पाहू शकला नाही. मात्र फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ गासेन्डीने अधिक्रमणे प्रथम पाहण्याचा मान मिळवला. त्याला केपलरच्या गणिताविषयी खात्री नसल्याने तो आधीपासूनच सूर्य बिम्बाचे निरीक्षण करू लागला. त्याला याचा फायदा होऊन सूर्य बिम्ब्वर बुधाचा ठिपका पाहण्याची संधी मिळाली. बुधाचे ७ नोव्हेंबर १६३१ रोजी शुक्राचे अधिक्रमण झाले. गासेन्दीला ते पाहता आले नाही. कारण फ्रान्समध्ये त्या वेळी रात्र होती. अधिक्रमाणे दुर्मिळ असतात. त्यामुळे संधी मिळताच हा अदभूत प्रकार पहावयास हवा.


बुधाचे अधिक्रमण - बुधाचे अधिक्रमणग्रहाचा सुर्याबिंबावरून होणारा प्रवास 'अधिक्रमण' म्हणून ओळखला जातो.सुर्याग्रहानात आमवस्येचा चंद्र चंद्र सुर्याबिंबावरून प्रवास करून सूर्याला शकतो, त्याचप्रमाणे बुध सुर्याबिंबावरून प्रवास करताना सूर्याचा झोतसा भाग शकतो. थोडक्यात, अधिक्रमण  हे एक प्रकारच्ये ग्रहनच असते. बुधाचे अधिक्रमण शंभर वर्षात तेरा-चौदा वेळा घडते.बुध सूर्याभोवती ८८ दिवसात फेरी मारतो.या वेळी तो दर ११६ दिवसांनी पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येतो. म्हणजेच त्याची अंतर युती होते. 



















मात्र, दर आंतर्युतीवेळी बुध सुर्याबिंबावरून सरकताना दिसत नाही. कारण बुधाच्या कक्षेने पृथ्वीच्या कक्षेशी ७ अंशाचा कोण केलेला आहे. त्यामुळे आंतर्युतीवेळी बुध कधी सूर्याच्या उत्तरेकडून तर कधी दक्षिणेकडून सरकतो. मात्र २३ आंतर्युतीपैकी एका युतीवेली बुध बरोबर सुर्याबिंबावर दिसल्याने अधिक्रमण घडते. बुध व पृथ्वीच्या कक्षा एकमेकांना ज्या दोन बिंदुंमध्ये चेडतात, त्या 'पातबिंदू'पाशी बुध असल्यास याच सुमारास येथे बुध आल्यास व आन्तेर्युती झाल्यास बुधाचे अधिक्रमण दिसते. अशी स्थिती सर्वसाधारणपणे ६,७, किंवा १३ वर्षांनी येऊ शकते. पृथ्वीवरून सूर्यबिंब ३०-३१ कालानेवढे तर बुधाचे बिंब अवघे १/६ कला एवढे दिसते. सर्वप्रथम फ्रेंच गणित तज्ज्ञ गासेन्डीने नोव्हेंबर १६३१ मध्ये बुधाचे अधिक्रमण पहिले. अतर २०१६, २०१९,२०३२, २०४९ मध्ये बुधाची अधिक्रमण दिसतील




आविष्कार उल्कांचा



आकाशाकडे काही वेळ नजर लाऊन बसल्यास नक्कीच 'तारा' गळाल्याचे दिसू शकते. खरे पाहता तारे कधीच गळून पडत नाही. आपल्याला दिसलेला गळालेला तारा ही  छोटीशी उल्का असते. आकाशातील वाळूंच्या काना एवढ्या आकाराचे कण वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरतात, तेव्हा घर्षणाने तापून पेटतात व क्षणभरच आपल्याला तारा गळाल्यासारखे वाटते.





 आकाशात हिंडणारे वालुकामय कण, लघुग्रह व छोट्या-मोठ्या पाषाणांचे छोटे कण व धूमकेतूंच्या शेपटीतील धूळ व छोटे कण यांच्यामुळे उल्कांचा आविष्कार दिसू शकतो, हे कण पृथ्वीच्या वातावरणात सेकंदाला १० ते ३० किलोमीटर वेगाने घुसतात व पृथ्वीपासून सुमारे १३० किलोमीटर उंचीवर पेटतात. क्षणभरातच त्यांची राख होते व ते दिसेनासे होतात. कित्येक वेळेस पेटलेल्या उल्का सोनेरी, पिवळसर किंवा हिरवट रंगाची झाक दाखवत कोसळतात. उल्केतील प्रचंड उष्णतेमुळे, धातूंच्या कणांमुळे व आजूबाजूच्या वातावरणातील वायूंच्या तापण्यामुळे, उल्का रंगेबेरंगी व प्रसंगी मागे धुराची रेषा ठेवीत नाहीशा होताना दिसतात. अंधारया ठिकाणून तासाला पाच-दहा उल्का पडताना आपण पाहू शकतो. मात्र दिवसभरात संपूर्ण पृथ्वीवर दोन ते तीन कोटी उल्का कोसळतात. यामुळे पृथ्वीवर दरवषी दहा हजार टनांची उल्कांची राख व अवशेष कोसळतात. उल्कांचा आविष्कार दाखवणारे आकाशस्थ पदार्थ मोठ्या आकाराचे असल्यास ते संपूर्ण पाने न जळता पृथ्वीवर कोसळतात. अशा पाषाणांना 'अशनी' म्हणतात. ते पृथ्वीवर कोसळताना मोठी प्रकाश ललका आकाशात दिसते व वातावरणात शिरताना मोठा आवाज करीत ते फुटतात.







धोकादायक उल्कापाषाण - आकाशात उल्का क्षणभरच दिसतात. वाळूच्या कणांच्या उल्का पृथ्वीवर पोचेपर्यंत जळून नाहीशा होतात.मात्र कधी कधी मोठे पाषाण कोसळ्यास मोठी हानी होते. ते संपूर्ण न जळाल्याने मोठा आवाज करीत पृथ्वीच्या वातावरणात शिरताना फुटतात. त्यांना 'अशांनी' म्हणतात. पृथ्वीवर कोसळलेल्या उल्का पाशानांना 'मिटी ओराईट' म्हणतात.
 पुरातन काळी मोठा उल्का पाषाण पृथ्वीवर कोसळला असावा. दर सेकंदाल ४०-४५ किलोमीटर वेगाने तो पृथ्वीवर कोसळतान महाभयानक स्फोट झाला. कोट्यावधी बॉम्बच्या स्फोटाएवढी ताकद त्यात असल्याने पृथ्वी थरथरली, अब्जावधी टन पेटते दगड व माती उंच आकाशात उधळली गेली. वातावरणात पसरलेल्या धुळीने व धुराने पृथ्वीभोवती अंधकार निर्माण केला. कदाचित काही महिने पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोचू न शकल्याने त्या काळात पृथ्वीवर वावरणारे डायनासोर्स सारखे मोठे प्राणी मृत्युमुखी पडू लागले. वनस्पती व प्राणी यांचे अतोनात नुकसान झाले. पृथ्वीवर मोठे पाषाण कोसळल्यावर अशी घटना घडते व ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी अशीच घटना घडली असावी. या प्रकारची प्रलयकारी घटना क्वचित म्हणजे १-३० कोटी वर्षात एखादेच वेळेस घडू शकते. सैबेरियातील तुन्गुस्कामध्ये कोसळलेल्या अशानी किंवा धूमकेतूने ४०० मैलांचा परिसर उद्ध्वस्थ केला होता. अमेरिकेतील अरॆसोन येथील विवर व महाराष्ट्रातील लोणार येथील विवर मोठ्या अशांनी किंवा धुमकेतूच्या कोसळण्यामुळे निर्माण झाली असावीत, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.त्यांच्या मते १ किलोमीटर आकारापेक्षा छोटे पाषाण फारसा विध्वंस करीत नाहीत. मात्र, त्यापेक्षा मोठे पाषाण मानवजातीला धोका निर्माण करू शकतात. 

अवकाशातील युत्या





चंद्र सूर्याच्या आकर्षणामुळे समुद्राला भारती येत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. त्याचप्रकारे ग्रह जवळ जवळ दिसू लागल्यावर त्यांच्या एकत्रित गुरुत्व कर्षनामुळे पृथ्वीवर प्रलयकारी स्थिती निर्माण होऊ शकते, तसा गैरसमज अनेक लोकांमध्ये दिसतो. अगदी अलीकडेच जोन ग्रीबीन यांनी १९८२ मध्ये झालेल्या ग्रहांच्या युत्यांमुळे सूर्यावर भारती येउन वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन त्याचा फटका पृथ्वीवासीयांना बसेल, असे त्यांच्या पुस्तकात लिहून घबराट पसरवली होती. तसेच त्यांनी याचमुळे कलीफोर्नियामध्ये भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती. भारतासह संपूर्ण जगात ५ फेब्रुवारी १९६२ रोजी अष्टग्रहीचा परिणाम म्हणून पृथ्वी नष्ठ होणार असल्याची अफवा पसरली होती. अगदी अलीकडेच म्हणजे मे २००० मध्ये चंद्रसुर्यासह पाच ग्रह एकत्र आले होते या दिवशी 'प्रलय होणार' अशी अफवा पसरवल्याने लोकांनी पळापळ केली.
  शास्त्रान्यांच्या मते पृथ्वीवर परिणाम करू शकणारा त्याच्या जवळचा एकुलता एक पिंड  चंद्रच आहे. इतर ग्रहगोल व सूर्य खूपच दूर असल्याने त्याचा फार मोठा परिणाम पृथ्वीवर होऊ शकत नाही. सूर्यासह सर्व ग्रहांचे गुरुत्वाकर्षण एकत्र केल्यास ते चंद्राच्या गुरुत्व कार्षानापेक्षा कमीच म्हणजे निम्मेच असते. याचमुळे सर्व ग्रह मंडळी व सुर्य याचा परिणाम पृथ्वीवर होऊन प्रलय होईल असे वाटण्याचे काहीच कारण नाही. तसेच चंद्र , सुर्य व सर्व ग्रह एका ओळीत येउन पृथ्वीवर परिणाम घडवतील हे अशक्यप्राय असल्याने आकाशात दिसणाऱ्या ग्रहांच्या संमेलनाविषयी घाबरून न जाता तो दुर्मिळ खगोलीय आविष्कार समजून त्याच्या  निरीक्षणाचा आनंद घ्यावयास हवा.





बहिर्युती-अंतर्युती-बुध-शुक्र हे सुर्य जवळचे ग्रह असल्याने ते सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर थोडा वेळ क्षितिजावर दिसतात. पृथ्वीच्या आतल्या कक्षेतून ते फेरी मारतात. ते अधून मधून पृथ्वी व सुर्य यांच्यामध्ये येताना सूर्याशी युती करतात. त्यास अंतर्युती असे म्हणतात. या वेळी ग्रहाची अप्रकाशित बाजू आपल्याकडे असते व त्यामुळे तो दिसत नाही. 
अंतर्युतीनंतर ग्रह सूर्यापासून जास्तीत जस्त २८ कोनीय अंशावर तर शुक्र ४७ कोनीय अंशापर्यंत दूर जाऊ शकतो. या स्थितीस ' परम इनांतर ' असे म्हणतात. यानंतर पुन्हा ग्रह सूर्याकडे सरकताना दिसू लागतो व संधिप्रकाश नाहीसा होतो. काही काळ तो सुर्यामागे गेल्याने त्यांची बहिर्युती पूर्वी व अंतर काही आठवडे ग्रह दिसू शकत नाही. युती नंतर पश्चिम क्षितिजावर सूर्यास्तानंतर दिसू लागतो. हळूहळू तो क्षितिजावर उंच उंच चढू लागून पुन्हा 'परमइनांतर' अंतरावर पोचतो.







खग्रास सुर्यग्रहन


अधून मधून ग्रहणांचा अविष्कार आपल्याला घरबसल्या पहावयास मिळतो. मात्र याला अपवाद आहे 'खग्रास सूर्यग्रहणाचा'. हे ग्रहण जेथे चंद्राची दाट सावली पडते तेथूनच दिसू शकते. साधारणपणे २५०-३०० किलोमीटर व्यासाच्या पट्ट्यातच चंद्रसावली पडते व ती तशी तीन हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीवरचा तेरा-चौदा हजार किलोमीटरचा प्रवास तीन - चार तासात संपवते. यामुळे खग्रास सुर्य ग्रहण दुर्मिळच असून ते पाहण्यासाठी दूर दूर जावे लागते. एखाद्या ठिकाणी सूर्य ग्रहण दिसले, तर तेथे पुन्हा सुर्य ग्रहण तब्बल साडेतीनशे वर्षांनी दिसू शकते. महाराष्ट्रात यापूर्वी खग्रास सुर्य ग्रहण १२ जानेवारी १८९८ व ११ ओगस्ट १९९९ रोजी व २२ जुलै २००९ रोजी दिसले.
खग्रास सूर्यग्रहनात  आमवस्येचा चंद्र सुर्य बिम्बास पूर्णपणे झाकत असल्याने रात्र झाल्याचा अनुभव पहावयास मिळतो. झाकल्या गेलेल्या सूर्य बिम्बाभोवती इतर वेळी कधीही दिसू न शकणारा सूर्याचा किरीट दिसू लागतो. सूर्यप्रकाश नाहीसा झाल्याने भर दिवस सुर्य बिंबा जवळचे सूर्य तारे दिसू लागतात. आसमंतात चित्र विचित्र प्रकारचे रंग पसरतात. ग्रहण सुरु होताना व सुटताना छाया प्रकाशाच्या लाटांचे  नर्तन पहावयास मिळते. तसेच खग्रास अवस्थेपुर्वी व नंतर सुर्य बिंबाच्या एखाद्या टोकातून येणारा सुर्य प्रकाश हिऱ्यात अंगठी बसविल्याप्रमाणे चमकताना दिसतो. याच वेळी काळ्या सुर्य बिम्बाभोवती दिसणारा मंद तेजाचा किरीट आपले भान हरपून टाकतो. वनस्पती व प्राणी अचानक झालेल्या अंधाराने गोंधळून जातात. हा अनुभव काही मिनिटेच अनुभवायला मिळतो.




भारतातील खग्रास सूर्यग्रहण ...जवळ जवळ दहा वर्षाच्या अंतराने भारतात खग्रास सुर्य ग्रहण दिसले. यापूर्वी ११ ओगस्ट १९९९ मध्ये चंद्र सावली भारतात कच्छच्या रानातून भारतात शिरली व भूज, समर्वियाली, बडोदा, संखेडा, भुसावळ, अकोला, यवतमाळ व  उत्तरेकडून निघून गेली. पण ढगांमुळे खग्रास सूर्यग्रहण दिसले नाही. मात्र गडद अंधकाराचा अनुभव घेता आला. पुढील २२ जुलैला सकाळी चंद्र सावली सुरत जवळून इंदूर, भोपाल, जबलपुर, पतन, वाराणसी, भूतान मार्गे चीन मध्ये जाताना खग्रास ग्रहणाचा अविष्कार दाखवेल. भारतात तीन साडेतीन मिनिटांची खग्रास अवस्था दिसेल.
  झालेली सुर्याग्राहणे..
२६ जानेवारी २००९ : आफ्रिका, आणतार्तिका, मादागास्कर, ओस्त्रोलीया.
९ फेब्रुवारी २००९ : आलास्का, हवे, ओस्त्रोलीया
७ जुलै २००९ : अमेरिका, ओस्त्रोलीया.
२२ जाली २००९ : भारत, नेपाल, चीन
६ ओगस्ट २००९ : युरोप, आफ्रिका.
३१ डिसेंबर २००९ : युरोप, आफ्रिका, आशिया.
१५ जानेवारी २०१० : आफ्रिका, भारत, म्यानमार, चीन

२६ जून २०१० : न्यूझीलंड, आशिया.





धुमकेतू - जन्म व मृत्यू

                      

आपल्या सूर्यमालेचा जन्म ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाला असावा. त्यावेळी ज्या पदार्थांपासून ग्रहगोल तयार होऊ शकले नाहीत त्यांच्यापासून लघुग्रह व धुमकेतू बनले असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. न्येप्च्यून पलीकडील कायपर पट्ट्यातून किंवा त्यापेक्षा दूर असलेल्या उर्ट पट्ट्यातून मेघापासून येत असतात. कायपर पट्ट्यातील धुमकेतू ठराविक  कक्षेतून आयनिक वृत्ताच्या पातळीतून सूर्यप्रदक्षिणा घालताना दिसतात. या भागात आत्तापर्यंत हजारपर्यंत शे दोनशे किलोमीटर व्यासाचे दगडधोंडे दिसलेले आहेत.प्लुटो ग्रह देखील याच परिसरात आढळल्याने, काही शास्त्रज्ञांच्या मते तो ग्रह नसून धूमकेतूच असावा. सूर्यापासून अतिदूर म्हणजेच सूर्य-पृथ्वी अंतराच्या ५०,००० अंतरावरच्या उर्ट मेघातील धुमकेतू काहीसे वेगळे आढळतात. या धूमकेतूंच्या कक्षा आयनिक वृत्ताच्या पातळीत नसतात. ते त्यांच्या आगळ्यावेगळ्या पातळीतून सूर्याच्या भेटीस येतात. त्यांचा सुर्य प्रदक्षिणेचा काळ लाखो वर्षांचा असू शकतो. या प्रकारचे धुमकेतू सूर्याला फेरी मारताना चुकून गुरु सारख्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणात सापडल्यास सूर्य-गुरु दरम्यानच्या पट्टयात राहून अवघ्या पाच दहा वर्षात प्रदक्षिणा घालू लागतात. धुमकेतू प्रत्येक सुर्याभ्रमानात  त्याच्यातील द्रव्य गमावत असतो. सूर्याजवळ आले असताना उष्णतेने त्यांच्यातील वायू आणि बर्फाची वाफ केंद्राभागातून बाहेर टाकली जाऊन धुमाकेतुंना शेपटी फुटते. धुमकेतू तसेच पुढे  जातात; मात्र त्यांनी मागे टाकलेली शेपटीतील धूळ व कन त्याच कक्षेत राहतात. यामुळे साधारण अर्धा- एक टक्का वस्तुमानाचा बर्फ व धूळ धुमकेतू प्रत्येक सुर्याभेतीत गमावतो.





धूमकेतूंचा मेघ....अचानक दिसणारे धुमकेतू कुठून येतात या प्रश्नाचे उत्तर १९५० पर्यंत ठावूक नव्हते.नावाच्या खगोल शास्त्राण्याने धूमकेतूंच्या कक्षा तपासून या प्रश्नाची उकल केली. काही धूमकेतूंच्या कक्षा सूर्य व गुरु यांच्यामध्ये आढळतात व ते पाच- दहा वर्षांत सूर्यप्रदक्षिणा घालतात. काहींच्या कक्षा न्येपाचून पलीकडील कायपर पट्ट्यापर्यंत पोचलेल्या दिसतात. या प्रकारचे धुमकेतू दर शेदोनशे वर्षांनी सूर्यप्रदक्षिणा घालतात. या प्रकारच्या धुमकेतू  मध्ये हालचा धुमकेतू, स्विफ्ट ताटल धूमकेतूचा समावेश होतो.जान उर्ट  ने अशा धूमकेतूंच्या कक्षा अभ्यासल्या,  ज्या सूर्यापासून खूप दूर म्हणजे पृथ्वी सूर्य अंतराच्या ५०,०००पट  दूरपर्यंत पोचलेल्या दिसल्या. सूर्याचे आकर्षण या पलीकडे आढळत असल्याने, या अंतरावरून  धुमकेतू सूर्याभोवती असतात हे त्याला समजले. त्याने जाहीर केले की, सूर्याभोवती धूमकेतूंच्या मेघांचे आवरण असून, त्यामध्ये किमान शंभर दोनशे  अब्ज धुमकेतू असावेत. हे धुमकेतू सूर्यापासून खूप दूर असल्याने, गोठलेले लहान मोठे धोंडेच असतात. ते काही कारणाने त्यांच्या कक्षेतून ढकलले गेले, तर सूर्याच्या दिशेने येउन नव्या कक्षेतून ढकलले गेले, तर सूर्याच्या दिशेने येउन नव्या कक्षेतून सुर्य प्रदक्षिणा घालू लागतात.उर्ट ने वर्णन केलेला धूमकेतूंचा मेघ जरी कोणीही पहिला नसला, तरी त्यांचेअस्तित्व खगोल शास्त्रान्यांनी मान्य केले असून, त्या मेघाला 'उर्ट क्लाईड' नावाने ओळखले जाते. या भागातून जे धुमकेतू सुर्य प्रदक्षिणा घालण्यासाठी सूर्यमालेच्या आतल्या भागात येतात,त्यांची  कक्षा लंब वर्तुळाकार  असते व त्यांना सुर्य प्रदक्षिणा करण्यास  काही लाख वर्ष लागत असल्याने आपल्या आयुष्यात त्यांचे एकदाच दर्शन घडते.